शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता “या” तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मोदी सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या farmers खात्यात 2,000 रुपयांचा 11 वा हप्ता जमा करणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार, या हप्त्याचे पैसे 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जाणार आहेत.
पीएम किसान सन्मान निधीचे पैसे पुढील आठवड्यात हस्तांतरित केले जातील असे मानले जात आहे. सरकारने अद्याप अधिकृतपणे तारीख जाहीर केलेली नाही, परंतु काही मीडिया रिपोर्टनुसार पुढील आठवड्यात हे जमा होणार असल्याचे बोलले जात आहेत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया करा, जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.
तर पैसे मिळण्यास होणार उशीर? सरकारने अलीकडेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. पीएम किसान पोर्टलवरील अपडेटेड माहिती पाहिल्यास, आता शेतकरी farmers ही प्रक्रिया 22 मे 2022 पर्यंत पूर्ण करू शकतात. याआधी शेवटची तारीख 31 मार्च 2022 होती. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 12.53 कोटी शेतकरी नोंदणीकृत आहेत. मात्र ज्या शेतकऱ्याने ई-केवायसी केलेले नाही अश्यांचा पुढील हप्ता मिळण्यास उशीर होऊ शकतो. या योजनेअंतर्गत दरवर्षी पहिला हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत येतो. दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान शेतकर्यांच्या खात्यावर पाठवला जातो.
ई-केवायसी कसे करावे सर्वप्रथम, pmkisan.gov.in टाइप करण्याचे काम करा. आता तुम्हाला पीएम किसान farmers पोर्टलचे मुख्यपृष्ठ दिसेल. त्याच्या खाली जा आणि तुम्हाला e-KYC लिहिलेले दिसेल. त्यावर टॅप करा आणि तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका आता त्यामध्ये आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर 4 अंकी OTP पाठवला जाईल. दिलेल्या बॉक्समध्ये तो योग्यरित्या टाइप करा