कोरोना संपताच CAA कायदा लागू करणार ; शाहांचे मोठं विधान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोलकाता :- सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी मोठे विधान केले असून, कोरोना संपल्यानंतर नागरिकत्व कायदा लागू करू असे मोठे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.
शहा दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आले असून त्यावेळी ते बोलत होते. सुधारित नागरिकत्व कायदा हे वास्तव असून तृणमूल काँग्रेस त्याबाबत काहीही करू शकत नाही, असे ते म्हणाले.
तृणमूल काँग्रेस अफवा पसरवत आहे की, नागरिकत्व कायदा कधीही अस्तित्वात येणार नाही. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, कोविड महामारी संपल्यावर आम्ही CAA लागू करू. ममता दीदींना घुसखोरी हवी आहे, पण CAA हे वास्तव आहे, त्याची अंमलबजावणी केली जाईल असे शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.