राज ठाकरेंच्या इशाऱ्यावर गृहमंत्री वळसे-पाटलांची महत्वाची प्रतिक्रिया , म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जुन्नर, 02 मे :- ‘राज्यात भोंगे महत्वाचा नाही, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भोगें काढले तर तुमच्या देवाचे कार्यक्रमांचे काय? असा परखड सवाल उपस्थितीत तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेतवर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरात सभा घेऊन 4 तारखेपासून भोंगे काढले नाहीतर हनुमान चालीसा वाजवू असा इशारा दिला आहे. त्यांच्या या सभेवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जुन्नर तालुक्यातील खोडद येथील एका जाहीर कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली. ‘राज्यात भोंग्यावरुन राजकारण केलं जातं आहे. भोंगा महत्वाचा नाही मात्र फक्त भोंग्यावरुन हिंन्दु मुस्लिम यांच्यामध्ये राज्यात वाद वाढण्याचा प्रयत्न होत आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भोगें काढले तर तुमच्या देवाचे कार्यक्रमांचे काय होईल, असा प्रश्न उपस्थितीत करत वळसे पाटील यांनी राज ठाकरेंवर निशाना साधला. ‘आता जर दुसऱ्याची खपली काढायला गेलो तर आपल्याच अंगावर येणार आहे. अरे…बाबा..हनुमान चालीसा हिंदीत आहे वाचायचीच असेल हनुमान स्त्रोत्र वाचा. असा खोचक टोलाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी राज ठाकरे यांना लगावला.
काय म्हणाले राज ठाकरे? ‘आज 1 तारीख आहे, 3 तारखेला ईद आहे, मला कोणतेही सणात विष कालवायचे नाही. त्यानंतर 4 तारखेपासून अवघ्या महाराष्ट्रात ऐकणार नाही. तमाम हिंदू बांधवांनी दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, नीट ऐकलं नाहीतर वाजवाचं. सगळ्या हिंदू बांधवांना सांगत आहे.
आजही परिस्थिती आहे. आज नाहीतर पुन्हा कधी नाही. ही लोक जर 3 तारखेपासून ऐकली नाही तर पोलिसांकडून परवानगी घेऊन जोरात काम करा. हा विषय कायम निकाली लागला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.
शरद पवार यांच्यावर राज ठाकरेंची टीका ‘माझ्या आजोबांनी जे लिहून ठेवलंय ते तुम्ही नीट वाचलं ते परिस्थितीला धरुन आहे. व्यक्तीसापेक्ष आहे. जातीपातीत भेद निर्माण करणं नव्हे. हा आपला हिंदू धर्म बांधणारा माणूस होता तो.
त्याची पूजा करणारा माणूस होता. त्या धर्मामधल्या ज्या गोष्टी होत होत्या त्यावर बोट ठेवणारा माणूस होता की, ही गोष्ट होता कामा नये. माझ्या आजोबा हे भटभिक्षुकीच्या विरोधात होते. धर्म बांधणारा माणूस होता.
म्हणून मी आज पवार साहेबांसाठी काही संदर्भ आणले आहेत. या लोकांनी जातीचं विष पसरवलं. ‘जात प्रत्येकाला होती. पण दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाला.
मराठा बांधवाची माथी भडकवायचा. जेम्स लेन नावाच्या माणसाचा पुस्तक काढात. ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देश आणि जगात घराघरापर्यंत पोहोचवले त्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या वृद्धोपकाळात पवार साहेबांनी त्रास द्यायला सुरुवात केली. कशासाठी?
तर ते ब्राह्मण आहेत म्हणून. आमच्या घरात कधी जातपात शिकवलं नाही. आम्हाला जातीपातीशी घेणंदेणं नाही. तुमच्या मताच्या राजकाणासाठी हे सगळं धुव्रीकरण करायचं तर रायगडावरची समाधी ही कोणी बांधली?
आमच्या शिवछत्रपतींची समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली. टिळकांना तुम्ही ब्राह्मण म्हणून पाहणार आहात का? लोकमान्य टिळकांनी काढलेल्या पहिल्या वृत्तपत्राचं नाव काय? तर मराठा! हे पवार साहेब कधी सांगणार नाहीत’ अशी टीकाच राज ठाकरे यांनी पवारांवर केली.