महायुती तुटणार..? शिवसेना शिंदे गटाकडून तयारी सुरू..? ; नेमकं काय घडतंय..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. एकीकडे विधान परिषद निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. जळगावच्या विधान परिषद जागेवर दोन्ही पक्षाकडून दावा करण्यात आला आहे.
जळगावच्या विधान परिषद जागेवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते किशोर पाटील यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. ही जागा शिवसेनेलाच मिळावी अशी त्यांची भूमिका आहे. तसेच जर महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला मिळणार नसेल तर या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत व्हावी असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान विधान परिषद निवडणुकीवरून रस्सीखेच सुरू असतानाच आता दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकीबाबत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी मोठं विधान केलं आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले मस्के?
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये युती हो अगर ना हो शिवसैनिक भगवा फडकवण्यासाठी तयार आहेत. याचीच बांधणी करण्यासाठी शिवसेनेचा शिवसंवाद दौरा होता, असं मोठं विधान नरेश मस्के यांनी केलं आहे. त्यामुळे आता आगामी जिल्हा परिषद निवडणुका या युतीत होणार की दोन्ही पक्ष ही निवडणूक वेगवेगळी लढणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये युती हो अगर ना हो शिवसैनिक भगवा फडकवण्यासाठी तयार आहेत. याचीच बांधणी करण्यासाठी शिवसेनेचा शिवसंवाद दौरा होता. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शहापूर आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा होता, असं मस्के यांनी म्हटलं आहे.
ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची देखील जोरदार चर्चा सुरू आहे, यावर देखील यावेळी मस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे साहेब स्वतःच टायगर आहेत, डॉक्टर टायगर! त्यामुळे त्यांना ऑपरेशन टायगरची गरज नाही, असं वक्तव्य यावेळी मस्के यांनी केलं आहे.

रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…
परप्रांतीयांचे धाबे दणाणले..! रिक्षा चालकांना मराठी येतं का..? तपासणी सुरु; 15 ऑगस्टनंतर थेट….