“बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- *महाराष्ट्राची निवडणूक पुढच्या आठवड्यात होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने दोन घोषणा आणल्या आहेत. एक है तो सेफ है आणि दुसरी घोषणा आहे बटेंगे तो कटेंगे.
या दोन्ही घोषणांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी एका कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात आमची कामगिरी चांगली नव्हती. याचं कारण आम्ही काऊंटर नरेटिव्ह सेट करण्यात कमी पडलो. संविधान बदलणार हे फेक नरेटिव्ह पसरवण्यात आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात आम्हाला त्याचा फटका बसला. आम्ही लोकसभा निवडणुकीत फक्त पक्षांशी नाही तर भारत जोडो सारख्या फोर्सशी लढत होतो. यामध्ये डाव्या विचारांचे लोक होते ज्यांनी एक चुकीचं नरेटिव्ह सेट केलं. आम्हाला वाटलं लोक आमच्या कामांकडे पाहतील. पण लोकांमध्ये भीती पसरवण्यात आली. संविधान बदलतील म्हणून घाबरवण्यात आलं. विधानसभेची गोष्ट मात्र वेगळी आहे. विधानसभेला हे फेक नरेटिव्ह आणि त्याचा परिणाम बऱ्यापैकी कमी झाला आहे. लोकांना समजलं आहे की त्यावेळी त्यांना कसं भडकवलं, घाबरवलं गेलं असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.
फेक नरेटिव्हला उत्तर देणं आवश्यक होतं-फडणवीस
यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, विधानसभेला आम्ही डाव्या विचारांच्या शक्तींशी लढण्यासाठी आमच्या संघ परिवार आणि त्यासारख्या असंख्य संघटनांकडे गेलो. त्यांना हे सांगितलं की तुम्ही यावर आम्हाला उत्तर शोधून द्या. फेक नरेटिव्हला काऊंटर कसं करायचं ते सुचवा. त्यामुळेच मी व्होट जिहादचा विरोध हा धर्मयुद्धाने केला पाहिजे असं म्हटलं होतं. आम्हाला त्यांची चांगली मदत झाली. त्यामुळे भारत जोडो सारख्या फोर्सशी आम्ही लढू शकतो. भारत जोडो हे फक्त नाव आहे. त्यांची नीती विभाजनाची आहे. त्यांनी धर्मांमध्ये, जातींमध्ये विभाजन करायचं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
३० हून अशा संघटना आहेत ज्यांच्यामुळे आम्हाला सहकार्य मिळालं
RSS ने थेट आमच्यासाठी काही केलं नाही. मात्र ३० हून अशा संघटना आहेत ज्या संघाची विचारधारांवर चालतात. त्यांना राजकारणात येण्याची गरज नाही. त्यांनी लोकांना हेदेखील सांगितलं नाही की भाजपाला मतदान करा. पण त्यांनी उजव्या विचारसरणीच्या लोकांना उत्तर देण्याचं काम केलं. त्यामुळे चुकीच्या नरेटिव्हशी लढण्यात आम्हाला नक्कीच फायदा झाला असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.
बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है यात गैर काय?
निवडणुकीच्या तोंडावर बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है या घोषणा देण्यात आल्या त्यावर टीका होते आहे. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एक है तो सेफ है असेल किंवा बटेंगे तो कटेंगे असेल या घोषणांमध्ये चुकीचं काय आहे? लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद झाला. धुळ्यासारख्या मतदारसंघात आम्ही १.९ लाख मतांनी पुढे होतो. या मतदारसंघातल्या फक्त मालेगाव या ठिकाणी ४ हजार मतांनी आम्ही मागे पडलो आणि आमचा पराभव झाला. अशा पद्धतीने इतर ११ मतदारसंघातही गोष्टी घडल्या. मुस्लिम मतं इतक्या मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीला मिळाली. कारण मुस्लिम धर्मगुरुंनी धर्मस्थळांवर पोस्टर लावले होते, तसंच मविआला मतदान न करणं ही अल्लाशी बेईमानी आहे हे सांगण्यात आलं. हा व्होट जिहादच नाही का? आम्ही काय म्हणत आहोत. एक राहा, कारण जेव्हा जेव्हा विभाजन झालं आहे आपल्याला गुलामीचं संकट सहन करावं लागलं आहे. फोडा आणि राज्य करा ही काँग्रेसची नीती आहे. त्यामुळे हिंदूंमध्ये वाद घडवले जात आहेत. जातींमध्ये भांडणं लावली जात आहेत. अशा परिस्थितीत आम्ही जर बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है सारखे नारे दिले तर त्यात चुकीचं काय? या दोन्ही घोषणा सकारात्मक आहेत.” असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…