मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्याला अटक…! ; पोलिसांनी लोणावळ्यात ठोकल्या बेड्या…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्फोट घडवून आणून जिवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती रविवारी समोर आली. ही माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे. लोणावळ्यात पोलिसांनी या व्यक्तीला बेड्या ठोकल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करण्याचा कट असल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी या व्यक्तीला अटक करून चौकशी केली. त्याने चौकशी धमकीचा फोन करण्यामागील कारणाचा खुलासा केला.
अविनाश आप्पा वाघमारे, असं पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याचं वय 36 वर्ष असून, तो घाटकोपर पूर्व भागातल्या रमाबाई आंबेडकर नगर, वसंतराव नाईक मार्ग, साठे चाळ येथील रहिवासी असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं.
अविनाश वाघमारे हा मूळचा आटपाडीचा रहिवासी आहे. अविनाश वाघमारे हा मुंबईला जात असताना लोणावळ्यातील एका धाब्यावर जेवण करण्यासाठी थांबला होता. हॉटेल मालकाने त्याला दहा रुपयाची पाण्याची बॉटल पंधरा रुपयाला दिली. त्यानंतर हॉटेल मालकाला अद्दल घडवण्यासाठी अविनाश वाघमारे याने हा फोन केला होता. अविनाश वाघमारेने स्वतःच्या फोनवरून १०० नंबरवर कॉल केला आणि मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याचा कट असल्याची खोटी माहिती दिली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जिवे मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं?
रविवारी (2 ऑक्टोबर) दुपारी 2.48 वाजण्याच्या सुमारास लोणावळा (ता. मावळ, जि. पुणे) येथील साईकृपा हॉटेल एनएच 04 येथे अटक आरोपीने दारूच्या नशेत हॉटेलचे मॅनेजर किशोर पाटील यांनी पाण्याची बाटलीची किंमत जास्त लावल्याचा राग मनात धरून हॉटेल मॅनेजर आणि कर्मचारी यांना त्रास देण्याच्या उद्देशाने विनाकारण मोबाईल वरून पोलिसांना खोटी माहिती दिली. यामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती. या आरोपीविरुद्ध लोणावळा शहर पोलिसांत विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….