शिवसेनासह शिंदे गटाला धक्का ; फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन मोठे नेते गेले भाजपात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपकडून विविध पक्षातील नेत्यांचे इनकमींग सुरूच आहे. मागच्या दोन महिन्यांपूर्वी सत्ता पालट झाल्यानंतर शिवसेनेतील काही नेते भाजपमध्ये जात आहेत तर काही नेते शिंदे गटात सामील होत असताना दिसत आहेत.
दरम्यान पालघरमध्ये शिवसेनेसह शिंदे गटाला मोठे खिंडार पडले आहे. पालघरमधील शिवसेनेचे दोन्ही माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये एक शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते तर एक मुख्यमंत्री शिंदे गटाचे कार्यकर्ते होते.
शिवसेनेच्या पालघरमधील अंतर्गत वादामुळे तरे यांचा पराभव झाला अशी चर्चा आहे. बोईसर विधानसभा मतदारसंघातून 2019 साली निवडणूक लढवताना विलास तरे यांना हार पत्करावी लागली. तेव्हापासून तरे अस्वस्थ होते आणि ते शिंदे गटात जातील, अशी चर्चा सुरु होती.
दरम्यान हा प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश पार पडला. त्यामुळे या प्रवेशाची राज्यभर चर्चा होताना दिसत आहे. पालघरमधील शिवसेनेचे अमित घोडा आणि विलास तरे यांनी प्रवेश केला आहे.
शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे विलास तरे यांनी भाजपत प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.
माजी आमदार विलास तरे आणि अमित घोडा या दोघांनीही पालघर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. विलास तरे हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 2009 आणि 2014 साली विलास तरे हे बहुजन विकास आघाडीकडून बोईसर विधानसभेवर निवडून आले होते. दरम्यान, 2019मध्ये निवडणुकीआधी तरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
अमित घोडा आणि विलास तरे यांची भाजपात प्रवेश केल्याने पालघरमध्ये भाजपला बळ मिळाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पालिका निवडणुकांच्या आधी घडलेला हा पक्षप्रवेश मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा हे दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांचे सुपुत्र आहे. ते 2016 साली झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून पालघर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. पण 2019 साली विधानसभा निवडणुकीसााठी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…