नवाब मलिक यांच्या विरोधातील याचिका मागे घेणार ; मोहित कंबोज यांच्या मुंबई न्यायालयात अर्ज…..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- नवाब मलिक यांनी शिवडी न्यायालयासमोर जमवलेल्या गर्दीमुळे कोरोना नियमाचे उल्लंघन झाल्याची तक्रार आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा याकरता भाजप नेते मोहित कंबोज यांनी याचिका दाखल केली होती
शिवडी न्यायालयाने कंबोज यांची मागणी फेटाळल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयात शेवटी न्यायालयाच्या निर्णय विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. आज मोहित कंबोज यांनी सत्र न्यायालयात केलेली याचिका मागे घेण्याकरता अर्ज दाखल केला आहे.
माजी मंत्री नवाब मलिक यांनी शिवडी न्यायालयासमोर जमवलेल्या गर्दीमुळे कोरोना नियमाचे उल्लंघन झाल्याची तक्रार आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा याकरता भाजप नेते मोहित कंबोज यांनी याचिका दाखल केली होती. शिवडी न्यायालयाने कंबोज यांची मागणी फेटाळल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयात शेवटी न्यायालयाच्या निर्णय विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. आज मोहित कंबोज यांनी सत्र न्यायालयात केलेली याचिका मागे घेण्याकरता अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 16 सप्टेंबर रोजी निर्णय होणार आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मानहानीची याचिका –
आर्यन खान प्रकरणानंतर नबाब मलिक ( Nawab Malik ) यांनी मोहित कंबोज यांच्यावर केलेल्या आरोपानंतर कंबोज यांनी शिवडी न्यायालयात नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान नवाब मलिक शिवडी कोर्टात हजर झाले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक जमवले असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली होती.
मलिक यांना काहीसा दिलासा –
कुर्ला येथील जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नबाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. सध्या नबाब मलिक न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयाच्या परवानगी नुसार कुर्ल्यातील खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मोहित कंबोज यांनी मागे घेतलेल्या अर्जामुळे नवाब मलिक यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
काय आहे याचिका –
मोहित कंबोज यांच्या याचिकेनुसार नवाब मलिक यांनी 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी झालेल्या याचिकादरम्यान मोठ्या प्रमाणात समर्थक गोळा केले होते. याप्रकरणी नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी याचिका दाखल केली होती. नवाब मलिक यांनी असे करून कोविड नियमांची, प्राकृतिक आपदा अधिनियमचा उल्लंघन केला आहे आम्ही संबंधित पोलिसात तक्रार करून सुद्धा पोलिसांनी काहीच दखल घेतली नाही. म्हणून त्यांच्या विरोधात आईपीसी कलम 156( 3 ) अन्तर्गत गुह्या दाखल करून योग्य ती कार्रवाई करण्याचा आदेश देण्यात याव अशी मागणी करण्यात आली होती.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…