असा कुठलाही सल्ला शरद पवारांनी दिला नाही ; शिंदेना मुख्यमंत्री करायची सल्ला वर राऊतांचं स्पष्टीकरण…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या सल्ल्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पवारांनी असा कुठलाही सल्ला दिला नसल्याचे राऊतांनी मीडियाशी संवाद साधताना स्पष्ट केले.
शरद पवार यांनी दूरध्वनीवरुन मुख्यमंत्र्यांना संपर्क साधून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा सल्ला (Advice) दिल्याचे म्हटले जात होते. मात्र संजय राऊतांनी ही बाब कोढून काढत या चर्चेला पूर्णविराम दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला. यानंतर उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली.
काय म्हणाले संजय राऊत…..?
अशा प्रकारचा कोणताही सल्ला माननीय पवार साहेबांनी दिला नाही. किंबहुना ही लढाई आपण शेवटपर्यंत लढायची, अशी भूमिका माननीय शरद पवारांनी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील आणि तेच राहतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर रहायला जात आहे. मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्याची मोह माया नाही. मातोश्री हे शिवसेनाप्रमुखांचं मूळ स्थान आहे. अविश्वास ठराव मांडल्यास बहुमत सिद्ध करुन दाखवू, असे राऊत यांनी स्पष्ट केले. मी सकाळपासून इथेच आहे. माननीय शरद पवार आता येऊन गेले. जयंतराव अशोकराव चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुप्रिया ताई सर्व आतमध्ये आहेत. दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी येऊन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी यासंदर्भात ज्या सद्भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल आभारी आहोत, असे राऊत म्हणाले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…