शेतकरी , फेरीवाले , वीज निर्मिती….! ; मोदी मंत्रिमंडळाने घेतले पाच मोठे निर्णय……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या वादळी बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाने आज पाच मोठे निर्णय घेतले आहेत.
यामध्ये शेतकरी, जम्मूमध्ये वीजनिर्मिती केंद्र, फेरीवाले, नक्षलग्रस्त आणि पोस्टाच्या बँकेबाबत हे निर्णय घेण्यात आले आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवरील 540 MW च्या क्वार हायड्रो पॉवर प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून 1975 दशलक्ष युनिट वीज निर्मिती केली जाणार आहे. यामुळे जम्मू काश्मीर विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनणार आहे. दुसऱ्या निर्णयात पंतप्रधान स्वनिधी योजनेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. फेरीवाल्यांना देण्यात येणारा निधी २०२४ पर्यंत दिला जाणार आहे.
तिसरा मोठा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आहे. रासायनिक खतांवर भरघोस अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. वाढत्या महागाईचा फटका खतांच्या किंमतीवर पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चौथा निर्णय हा नक्षलग्रस्त भागातील दूरसंचार सेवेबाबत आहे. १० राज्यांतील नक्षलग्रस्त भागातील जवळपास 2542 मोबाईल टॉवर टूजी वरून ४जी लेस केले जाणार आहेत. यासाठी मोदींनी 2426 रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

पाचवा निर्णय हा पोस्ट ऑफिसच्या पोस्ट पेमेंट बँकेबाबत आहे. ग्रामीण भागात बँकिंग सुविधा मिळण्यासाठी तसेच तेथील महिलांना मोठ्या प्रमाणावर बँकेशी जोडले जावे या उद्देशाने या बँकेचा विस्तार केला जाणार आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…