गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाची पुढची दिशा मांडली आहे. मुंबईत आज ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात नेमकं काय काय घडलं? मोदी यांनी नेमका काय विकास केला, याची सविस्तर माहिती दिली. मोदी यांच्या काळात भारताचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. भारताची अर्थव्यवस्था वाढली, असे फडणवीस म्हणाले.
आज भारत आत्मनिर्भर भारत म्हणून स्वाभिमानाने उभे असलेला गेल्या 12 वर्षांत पाहायला मिळत आहे. 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम एका पुस्तकात मांडणे शक्य नाी. मोदी यांच्या कामाबाबत बोलणं भाषणातही कठीण आहे. विविध क्षेत्रात जे परिवर्तन झाले, त्याची ही बारा वर्षे आहेत. या वर्षात आपण सगळ्यात महत्त्वाची वाटचाल ही सामाजिक क्षेत्रात झालेली आहे. गरिबांना गॅस देणे, गरिबांना घर देणे, गरिबांना शौचालय दणे ही कामे झाले. मोदींजींनी गरीब केंद्रीत असा अजेंडा चालवला. दहा वर्षात भारताने 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. हे जगाने मान्य केलेले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
पंचवीस कोटी लोक गरिबीत होते, ते गरिबी रेषेच्या वर आले. गेल्या दहा वर्षात असे करणे जगातील कोणत्याही देशाल शक्य झाले नाही. ते भारताने मोदी यांच्या गरीब कल्याणाच्या अजेंड्याने करून दाखवले. आपण आता पुढेच जाणार आहोत. कारण मोदीजींनी भक्कम पाया रचला आहे. अर्थव्यवस्था म्हणून भारताने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. भारताचा जीडीपी 2013 साली 103 लाख कोटी होती. आज तो जीडीपी 357 लाख कोटींपर्यंत पोहोचला आहे. म्हणजे दहा वर्षात भारताचा जीडीपी तीन पटींनी वाढला, असेही फडणवीस म्हणाले.
देशातील अर्थव्यवस्थेची वाढ होत आहे. यूपीएच्या सरकारमध्ये आम्ही लोकांसाठी योजना तयार करू, अनुदानावर लोकांनी जगलं पाहिजे. आम्ही नवी संधी निर्माण करणार नाही, असे ते धोरण होते. पायाभूत सुविधा करण्यावर आम्ही खर्च करणार नाही, असे यूपीएचे धोरण होते. अनुदानप्रणित अर्थव्यवस्था त्या काळात तयार झाला. हळूहळू अर्थव्यस्थेवरील ताणामुळे आपण नवी संधी निर्माण करू शकलो नाही, अशी टीका त्यांनी याआधीच्या यूपीए सरकारवर केली.

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…
परप्रांतीयांचे धाबे दणाणले..! रिक्षा चालकांना मराठी येतं का..? तपासणी सुरु; 15 ऑगस्टनंतर थेट….
जम्मू-काश्मीरमध्ये रोपवे हवेत अचानक बंद, ३०० पर्यटक अडकले; रेस्क्यू ऑपरेशन जारी….
पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय…
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….