महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही ; देवेंद्र फडणवीसांचा इशारा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना एनआयए आणि ईडी या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या ६० ते ७० जणांवर पुणेपोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेने पीएफआयच्या राज्यस्तरीय नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आरोपींनी मोठमोठ्याने घोषणा देत रस्ता अडवला. त्यात पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबरचे नारे देण्यात आले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या व्हिडीओविरोधात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात, भारतात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करु, घोषणा देणार जिकडे असतील, तिकडे जाऊन त्यांना शोधून काढू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच पीएफआयकडून देशात अशांतता निर्माण करण्याचं षडयंत्र रचण्यात येत होतं, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, एनआयए आणि अन्य केंद्रीय यंत्रणांनी धडाकेबाज कारवाई करत पीएफआय या संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांसह प्रमुखाच्या मुसक्या आवळल्या होत्या. या कारवाईला काही ठिकाणी विरोध होत आहे. पीएफआयवर करण्यात आलेल्या कारवाईमागे अनेक खास गोष्टी आहेत. सर्व ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली होती. तसंच एवढ्या मोठ्या ऑपरेशनला अगदी शांतपूर्ण पद्धतीनं पार पाडण्यात आलं. कोणत्याही हिंसक कारवाईची गरज पडली नाही. सुत्रांच्या माहितीनुसार येणाऱ्या काळात आणखी काही टेरर ग्रूप्स सरकारच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्याविरोधात सबळ पुरावे प्राप्त झाल्यानंतर तातडीनं कारवाई केली जाणार आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…