भाजपा-मनसे युती होणार का..? ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर जाहीर होणार..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होणार असल्याची चर्चा आहे.
राज्यात लवकरच होणार असलेल्या वेगववेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ही युती जाहीर होण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांत भारतीय जनता पार्टीकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटींमुळेच भाजप आणि मनसे युती करणार असल्याची चर्चा जोर रू लागली आहे.
भाजपने आधीच शिंदे गटाच्या माध्यमातून शिवसेनेत फूट पाडली आहे. आता मनसेसोबत युती करून भाजप राज्यातील राजकीय पकड आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. लवकरच मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच भाजप नेत्यांची मनसेसोबतच्या युतीची चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे.
आधी मराठीचा मुद्दा घेऊन राजकारण सुरू करणाऱ्या मनसेने काही महिन्यांपूर्वी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेण्यास सुरुवात केली आहे. याच कारणामुळे भाजप आणि मनसे यांच्या युतीची शक्यता निर्माण झाली आहे.
गणेशोत्सवात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते निवडक ठिकाणी गणपती दर्शन घेणार आहेत तसेच भाजप नेत्यांशी चर्चा करणार आहेत. अमित शहांच्या या दौऱ्यारम्यान भाजप-मनसे युतीबाबत महत्त्वाची चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…