अजूनही दरवाजे खुले , शिवसेनेच्या नेत्यांचे मोठे विधान , शिंदे गटातले आमदार परतणार..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 07 ऑगस्ट :- शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेले आमदार शहाजी बापू पाटील आणि उदय सामंत यांनी एकत्र येण्याचे भाष्य केलं आहे. ‘त्यांनी आधीही भूमिका घेतली असती तर ही वेळ आज आली नसती, अजूनही वेळ गेली नसून दरवाजे खुले आहे’, अशी सूचक प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी दिली.
महिना झाला तरी अजूनही विस्तार झाला नाही त्यामुळे शिंदे गटात मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे चलबिचल सुरू असल्याचे समोर आले आहे. अशाच दीपक केसरकर, शहाजी बापू पाटील आणि उदय सामंत यांनी शिवसेना आणि शिंदे गटाने एकत्र येण्याचे भाष्य केले आहे, त्यांच्या या विधानावर सचिन अहिर यांनी भाष्य केलं. ‘शहाजी पाटील, उदय सामंत यांची शिंदे-ठाकरे एकत्र येण्याची इच्छा आहे. त्यांना फार उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे.
ही भूमिका जर आधी घेतली असती तर ही वेळ आली नसती. पक्षप्रमुखांचं नेतृत्व त्यांना मान्य असेल तर त्यांना आमचे नेहमीच दरवाजे उघडे आहेत, असं अहिर म्हणाले.
‘दीपक केसरकर यांनी भूमिका मांडली आहे, आम्ही त्यांचं स्वागत करतोय. आदित्य ठाकरे यांनी त्यांना काल काय बोलायला पाहिजे, हे त्यांनी चांगलं सांगितलं.
ही जी विसंगती आहे ती आता हळूहळू सुरू होईल. नितेश राणे बोलले आहेत, आता निलेश राणे बोलायचे बाकी आहेत. हे सर्व झाल्यावर समजेल युतीमध्ये काय सुरू आहेत ते’ असंही अहिर म्हणाले. मंत्रालय नाव द्यायचं की सचिवालय नाव द्यायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे.
संपूर्ण राज्यात पुराची परिस्थिती आहे. महिलांवर अत्याचार होत असताना कुठलीही प्रशासकीय धाक राहिलेली नाही आहे अनेक जीआर काढले आहेत पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. दिल्लीवारी किमान मंत्रिमंडळवारी होईल असं वाटलं पण ते देखील होत नाही आहे. ‘पालकमंत्री लागतात, मंत्री लागतात, प्रशासनावर वचक लागत असतो.
आमची अपेक्षा होती किमान या दिल्लीवारीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. पण, कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही यात खोळंबा चाललेला आहे. आज सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडण्याचं काम यांनी केलं आहे. नसेल तर त्यांनी जाहीरपणे सांगावं आमचं दोघांचं मंत्रिमंडळ आहे, मग आम्ही उत्तर देऊ, अशी टीकाही अहिर यांनी केली.
उदय सामंत दोन्ही बाजू ओळखून आहेत. उदय सामंत आणि केसरकर यांचे संबंध कसे आहेत हे मी सांगायची गरज नाही, असंही अहिर म्हणाले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…