बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी मुंबईत केंद्रांचे दोन हजार जवान तैनात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या गोव्यावरून मुंबईला येणार असून त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सीआरपीएफच्या तब्बल दोन हजार जवानांची सुरक्षा दिली आहे.
बंडखोर आमदार उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईमध्ये पोहोचणार असून त्यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे.
राज्यपालांनी उद्या म्हणजे गुरुवारी बहुमत चाचणीसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या गटातील जवळपास 50 आमदार हे गुवाहाटीवरुन आज गोव्याला पोहोचणार आहेत. त्यानंतर उद्या हे सर्व आमदार मुंबईत पोहोचणार आहेत.
या बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी अनेक आमदारांच्या कार्यालयांवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे हे आमदार मुंबईत आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेचं काय असा सवाल विचारण्यात येत होता. आता त्यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे दोन हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत. या बंडखोर आमदारांना विमानतळापासून ते विधानसभेपर्यंत नेण्याची जबाबदारी ही या जवानांवर आहे.
शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी नोटीसा बजावल्या असून कोणतेही प्रक्षोभक वक्तव्य करुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नये असा आदेश दिला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…