महाविकास आघाडीचे सरकार बहुमत सिद्ध करेल ; शरद पवारांनी विश्वास दाखवला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे.
शिवसेनेच्या ४२ आमदारांनी बंड केल्याचे समोर आले आहे. या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच ढवळून निघाले. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
या परिस्थितीवर मात करुन महाविकास आघाडीचे सरकार बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. अडीच वर्षे महाविकास आघाडीने चांगले काम केले. कोरोना काळात चांगले काम केले. प्रसिद्धी माध्यमातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. ज्या पद्धतीने शिवसेनेच्या आमदारांना घेऊन गेले आहेत त्याची वस्तुस्थिती लोकांना सांगतिली आहे, आणि अजूनही त्यातील आमदार शिवसेनेसोबत आहोत हे स्पष्ट करतील, असं शरद पवार म्हणाले.
या परिस्थितीवर मात करुन महाविकास आघाडीचे सरकार बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. या अडीच वर्षात महाविकास आघाडीने चांगले काम केले आहे. चांगले निर्णय घेतले आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग फसलेला नाही. गुवाहाटीला गेलेले आमदार परत आले की स्पष्ट होईल बहुमत कोणाच्या बाजूने आहे, पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार आहे हे देशाला दिसेल, असंही शरद पवार म्हणाले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…