PM मोदींच्या स्वप्नातील मुंबई-अहमदाबाद प्रकल्प ठाकरेंमुळे रखडला ; रेल्वे मंत्र्यांचे थेट आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- PM मोदींच्या स्वप्नातील देशातील पहिला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात रखडला, असा थेट आरोप रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी केला आहे.
शिंदे-भाजप सरकारनं परवानग्या दिल्यानं प्रकल्पाला गती आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
हा प्रकल्प २०२३ मध्येच पूर्णत्वास येणार होता. मात्र, या प्रकल्पाच्या विविध कामांना आवश्यक असलेल्या परवानग्या उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात देण्यात आल्या नसल्याचेही ते म्हणाले. वैष्णव यांच्या या आरोपांमुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार असून, या आरोपांना ठाकारे गट काय उत्तर देतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्रात बुलेट ट्रेनच्या विविध कामांना आवश्यक असलेल्या परवानग्या उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात देण्यात आल्या नाहीत. मात्र, सत्तातर होताच शिंदे-फडणवीस यांनी या प्रकल्पाला आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या दिल्या आहेत. त्यामुळे आता याप्रकल्पाला गती मिळणार आहे.
यावेळी वैष्णव यांनी काल अर्थमंत्र्यांनी रेल्वेसाठी केलेल्या तरतुदींबाबतही भाष्य केले. सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.41 लाख कोटींची भांडवली तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत हायस्पीड ट्रेन, बुलेट ट्रेन आणि नवीन ट्रॅकवर भर दिला जाणार असून, यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे.