चिन्हाबाबतच्या निर्णयापूर्वी केसरकराचं मोठं विधान ; म्हणाले विजय…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदे यांनी बंड करुन शिवसेनेचे ४० आमदार फोडले. राज्यात शिंदे-फडणवीसांची सत्ता स्थापन झाली. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी थेट शिवसेना पक्षावर दावा ठोकला. ‘आमचीच खरी शिवसेना?’ असं म्हणत निवडणूक आयोगाकडे पक्षावर दावा केला.
आज निवडणुक आयोगात याबाबत सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत दीपक केसरकर यांनी मोठं विधान केलं आहे.
निवडणूक आयोगाने उपलब्ध पुराव्यांवरुन शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवलं. त्यानंतर दोन्ही गटांकडून आयोगाकडे पुरावे सादर करण्यात आले आहेत. आयोगाकडे याबाबत सुनावण्यात झालेल्या आहेत.
केसरकर म्हणाले की, अंतिम विजय सत्याचाच होतो. लोकशाहीत पाहिलं तर ज्या पक्षाला लोक जास्तीत जास्त मतदान करतात, त्यांना राज्याचा किंवा राष्ट्रीय पक्ष अशी मान्यता मिळते. त्यामुळेच पक्षाला मिळणारी मतं आणि निवडून आलेले उमेदवार याला महत्त्व द्यायला हवं. अशी आमची मागणी आहे. शेवटी निर्णय महत्त्वाचा आहे, असंही केसरकर यांनी नमूद केलं.
दरम्यान निवडणूक आयोग संवैधानिक आहे. ते योग्य तोच निर्णय देतील. तुम्ही कितीही पटवून सांगण्याचा प्रयत्न केले तर तुम्ही मुळ विचारांपासून दूर गेलात. मात्र आम्ही बाळासाहेबांच्या विचारधारेसोबत आहोत, असंही केसरकर म्हणाले.