फडणवीसांनी राहुल गांधीना दाखवलं गांधीजींचं पत्र, “शेवटची ओळ वाचली का…?”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर राहुल गांधींनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सध्या राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर आहेत.
ही यात्रा महाराष्ट्रातील विविध भागांमधून पुढे -पुढे सरकत आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यानंतर राज्यासह देशभरातील सावरकर प्रेमींनी राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
गांधींच्या या विधानावर शिंदे-फडणवीस सरकार मधून देखील संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत राहुल गांधींवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहीले आहे की, “देश तुम्हाला नेहमीच विचारत आला आहेत की, जर तुम्ही सावरकर यांच्या बद्दल काही विशिष्ट वाचल तर देशातील कित्येक पिड्या हा प्रश्न विचारत राहिलतील, शेवटी त्यांनी लिहिले आहे की “अरे भाई आख़िर कहना क्या चाहते हो”.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावरकर यांच्या बद्दल केलेले भाषन देखील ट्विट केले आहे. आणि लिहिले आहे की, “महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष स्थान असलेले शरद पवार वीर सावरकरांबद्दल काय म्हणतात ते फक्त वाचा आणि ऐका. या पत्रात त्यांनी दोन जन्मठेपेचा उल्लेख केला आहे”.
तर सावरकर यांच्या बद्दल काँग्रेसचे माजी नेते, देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव म्हणतात की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांची सामाजिक सुधारणेची बांधिलकी, आजच्या तरुण पिढीला ते शिकवण्याची ऊर्जा अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी काय म्हणाले याचे एक पत्र देखील ट्विट केले आहे. तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे सावरक यांच्या बद्दल असलेले विचार देवेंद्र फडणवीसांनी ट्विटमध्ये त्यांचे पत्र पोस्ट केले आहेत.