एकनाथ शिंदेंच्या गुवाहाटीवारीवर राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अकोला :- काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. अकोल्यात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला आहे. सोबतच त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर देखील जोरदार टीका केली आहे.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटीवारीवर प्रतिक्रिया दिली आहे. पन्नास खोक्यांची ऑफर देण्यात आली होती, असं मला शिवसेनेच्या एका आमदाराने सांगितल्यांचं त्यांनी म्हटलं. सावरकरांबद्दल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य दरम्यान यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
त्यामुळे आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. सावरकरांनी इग्रजांना पत्र लिहीलं. सावकरांनी पत्राच्या माध्यमातून माफीनामा सादर केला. त्यांनी इंग्रजांची मदत केली असं वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे.
सोबतच हिंमत असेल तर भारत जोडो यात्रा आडवून दाखवा असं आव्हानही राहुल गांधी यांनी भाजपाला केलं आहे.
केंद्र सरकारवर घणाघात पुढे बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर देखील जोरदार टीका केली आहे. राज्यात रोजगार नाही. शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नसल्यानं तरुण पिढी नैराश्यात आहे.
महागाई वाढली आहे. सरकारी शाळा बंद करण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. सरकारी शाळा बंद झाल्या तर गरिबांनी कुठे शिकायचं असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
संसदेत बोलू दिलं जात नाही सत्ताधाऱ्यांकडून न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात आहे.
आम्हाला संसदेत बोलू दिलं जात नाही. त्यामुळे आता जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी यात्रेशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्यांचही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांनी थेट भाजपलाच भारत जोडो यात्रा आडवून दाखवा असं आव्हान केलं आहे. त्यामुळे आता भाजप नेते राहुल गांधी यांच्या या आव्हानाला काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.