आदित्य ठाकरे त्यांच्या गळ्यात गळे…; देवेंद्र फडणवीसांची टोकाची टीका…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांना जोरदार टोला लगावला आहे. फडणवीसांचा पलटवार रोज खोटं बोलायचं हे काँग्रेसचं कामच आहे.
सावरकरांबद्दल काँग्रेस रोज खोटं बोलतं. राहुल गांधी यांना जनताच उत्तर देईल. राहुल गांधी यांना योग्यपद्धतीने उत्तर दिलं गेलं पाहिजे. त्यांना सावरकरांचा ‘स’ सुद्धा माहित नाही.
सावरकरांइतके दुसऱ्या कोणत्याही नेत्याने अत्याचार भोगले नाहीत. हिंदू समाज एकत्र आणण्याचं काम सावरकर यांनी केलं. जोपर्यंत हिंदू समाज एकत्र होता तोपर्यंत मजबूत होता. हिंदुत्व हीच जीवनपद्धत आहे.
हाच सावरकरांचा वारसा बाळासाहेबांनी चालवला, मात्र आता आदित्य ठाकरे हे सावकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळ्यात गळे घालत आहेत. असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
नेमकं काय म्हटलं होत राहुल गांधी यांनी…?
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे.
सावरकर यांना दोन, तीन वर्षांसाठी अंदमान जेलमध्ये ठेवलं तर त्यांनी लगेच इंग्रजांना चिठ्ठी लिहीनं चालू केलं. मला माफ करा, तुम्हाला जे लागतं ते घ्या पण मला मुक्त करा असं सावरकर यांनी म्हटल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
शिंदे गटाचा निशाणा
दरम्यान दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी देखील राहुल गांधी यांच्या या टीकेचा समाचार घेतला आहे. ‘भारत जोडोच्या नावाखाली काँग्रेस जोडो (वाचवो) करणाऱ्या या फरिश्त्याला इतिहास माहीत आहे का? दोन जन्मठेपा म्हणजे काय माहित आहे का? युवराज राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन सावरकरांचा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही’ असं ट्विट नरेश मस्के यांनी केलं आहे.