भारत जोडो यात्रेचा आजचा महाराष्ट्रातील चौथा दिवस ; राष्ट्रवादीचे बडे नेते होणार सहभागी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. या पदयात्रेचा आजचा 64 वा तर महाराष्ट्रातील चौथा दिवस आहे. राहुल गांधींची ही पदयात्रा महराष्ट्रात दाखल झाल्यापासुनच तिला उत्तम प्रतिसाद मिळात आहे.
भारत जोडो यात्रेच्या आजच्या चौथ्या दिवशी राष्ट्रवादीचे बडे नेते आज या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. यामध्ये जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे (supriya sule), आमदार रोहित पवार (rohit pawar) सहभागी होणार आहेत. त्याच बरोबर या पदयात्रेच्या आजच्या चौथ्या दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरली आहे.
आज सकाळी 6 वाजल्यापासून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला नांदेड मधील लोह या ठिकाणाहून सुरुवात झाली. तर संध्याकाळी 4 वाजता पुन्हा ही यात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल. तर सायंकाळी 6 वाजता न्यु मुंडा मैदान येथे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. या पदयात्रेत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रातील नांदेड (nanded) जिल्ह्यातमध्ये देगलूर येथून 7 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. बुधवारी 9 नोव्हेंबर रोजी ही पदयात्रा बिलोली तालुक्यातील कृष्नूर ठिकाणाहून सकाळी 6 वाजता पुढील प्रवासासाठी निघाली. भारत जोडो यात्रा जेव्हा (bharat jodo yatra) महाराष्ट्रात दाखल झाली तेव्हपासूनच या यात्रेला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशातच राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्यासुद्धा पदयात्रेत दिसल्या. अशोक चव्हाण यांच्या कन्या या पदयात्रेत राहुल गांधी यांच्यासोबाबत मार्गक्रमण करताना दिसल्या. जागोजागी त्यांचे बॅनर्स सुद्धा यला मिळाले. त्यामुळेच राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले आहे.
2024 च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन पक्षबांधणीच्या उद्देशाने राहुल गांधी (rahul gandhi) यांची ही भारत जोडो यात्रा सुरु आहे. 2024 च्या निवडणुकांची सर्वच पक्ष आतापासून तयारी करताना दिसत आहेत.